श्रीलंकन टीमच्या खेळाडूंची बस चाहत्यांनी अर्धातास रोखली

 कारण श्रीलंकन चाहत्यांनी ती बस अर्धा तास अडवून आपली नाराजी व्यक्त केली.

Updated: Aug 21, 2017, 06:49 PM IST
श्रीलंकन टीमच्या खेळाडूंची बस चाहत्यांनी अर्धातास रोखली title=

दाम्बुला : भारताविरूद्ध तीन कसोटी सामन्यात श्रीलंकेला ३-० ने दारूण पराभव स्वीकारावा लागला. सामना संपल्यानंतर श्रीलंकन टीमची बस स्टेडीअम बाहेर जायला अर्धा तास लागला, कारण श्रीलंकन चाहत्यांनी ती बस अर्धा तास अडवून आपली नाराजी व्यक्त केली.

रविवारी दाम्बुलात खेळल्या गेलेल्या ५ सामन्याच्या सिरीजमध्ये, पहिल्या सामन्यात ९ विकेटने श्रीलंकेचा दारूण पराभव झाला. अखेर हा पराभव श्रीलंकन टीमच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागला, आणि त्यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. प्रशंसकानी रडून आपली नाराजी व्यक्त केली.

यानंतर श्रीलंकन टीमच्या प्रस्थानाला अर्ध्यातासाचा उशीर झाला. प्रशंसकांनी श्रीलंकन टीमच्या खराब खेळाबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवला. यावेळी श्रीलंकन टीमची बस थांबवून खेळाडूंनी आपली नाराजी व्यक्त केली.