ranadada

तुझ्यात जीव रंगला : राणादा-अंजली घरी परतणार

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्यात जीव रंगलामधील राणादा आणि अंजलीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या दोघांचं नुकतंच लग्न झालं परंतु लग्नानंतर राणाने आपल्या संसाराची सुरुवात शेतातील घरात करण्याचा निर्णय घेतला. अर्थात त्याच्या या निर्णयामागे वहिनीचं कारस्थान होतं ज्याला राणा बळी पडला होता. राणाने थोरल्या सुनबाईसह घरी परतावं यासाठी राणाचे आबा प्रतापराव आणि गोदाक्का दोघेही विविध प्रकारे प्रयत्न करत होते. त्यांच्या या प्रयत्नाला आता यश येणार असून या राणा आणि अंजली गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहेत. त्यामुळे  मराठी नववर्षाची सुरुवात ज्या सणाने होते त्या गुढीपाडव्याचा आनंद गायकवाडांच्या घरातही पाहायला मिळणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त या मालिकेला नवं वळणं मिळणार आहे. 

Mar 24, 2017, 04:48 PM IST

'तुझ्यात जीव रंगला'ने केला नवा विक्रम...

साधाभोळा राणादा-अंजली बाईंच्या प्रेमकथेवर आधारित 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेय. त्यामुळेच मालिकेचा टीआरपीही झपाट्याने वाढतोय.

Mar 17, 2017, 05:25 PM IST

राणा आणि पाठकबाईंच्या उपस्थितीत रंगली महिला दिन रॅली

जागतिक महिला दिनानिमित्त कोल्हापूरात खास रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचं मुख्य आकर्षण होतं राणा आणि पाठकबाई.

Mar 9, 2017, 01:48 PM IST

भाबड्या मनाचा राणादा खलनायकाच्या भूमिकेत

झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका सध्या प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतलीये. निरागस स्वभावाचा राणादा आणि अंजली बाईंच्या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची मोठी पसंतीची पावती मिळतेय.

Mar 9, 2017, 10:21 AM IST

हळद लाविते गं!

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील राणादा आणि अंजली बाईंचे लग्न अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलंय.

Mar 4, 2017, 11:48 AM IST

पाहा राणादा-अंजलीच्या लग्नाची पत्रिका

येत्या ५ मार्चला राणादा-अंजली बाईंचा विवाहसोहळा पार पडतोय. या लग्नासाठी जोरदार तयारीही सुरु आहे. 

Mar 2, 2017, 01:16 PM IST