पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 'मन की बात' कार्यक्रमात देशातील वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, खाद्यतेलाचे प्रमाण 10% कमी करण्यासारख्या छोट्या प्रयत्नांनी हे आव्हान हाताळता येते. पंतप्रधान म्हणाले की, ते यासाठी एक आव्हान सुरू करतील. यामध्ये 10 लोकांना आव्हान देतील की, ते त्यांच्या जेवणात तेल 10% कमी करू शकतात का? सोमवारी पंतप्रधान मोदींनी यासाठी 10 जणांना आव्हान दिले. ज्यात जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांचा समावेश आहे.
रविवारी झालेल्या 'मन की बात' मध्ये सांगितल्याप्रमाणे, मी लठ्ठपणाविरुद्धच्या लढाईला बळकटी देण्यासाठी आणि अन्नात खाद्यतेलाचा वापर कमी करण्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी या 10 जणांना नामांकित करू इच्छितो. तसेच मी त्यांना प्रत्येकी 10 जणांना नामांकित करण्याचे आवाहन करतो जेणेकरून आमची चळवळ मोठी होईल," असे पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर पोस्ट केले.
As mentioned in yesterday’s #MannKiBaat, I would like to nominate the following people to help strengthen the fight against obesity and spread awareness on reducing edible oil consumption in food. I also request them to nominate 10 people each so that our movement gets bigger!… pic.twitter.com/bpzmgnXsp4
— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये सांगितलं की, एका अभ्यासानुसार प्रत्येक 8 व्यक्तींपैकी एक व्यक्ती लठ्ठपण्याच्या समस्याने हैराण आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे. ही समस्या त्यांच्यासाठी चार पटीने वाढली आहे. WHO चा डेटा सांगतो की, 2022 मध्ये जगभरातील सुमारे 25 कोटी लोक जास्त वजनाचे होते. पंतप्रधान म्हणाले, 'आपण एकत्रितपणे छोट्या प्रयत्नांनी या आव्हानाचा सामना करू शकतो. उदाहरणार्थ, मी सुचवलेली एक पद्धत म्हणजे स्वयंपाकाचे तेल 10 टक्क्यांनी कमी करणे.
पंतप्रधान म्हणाले, “आज, मन की बातच्या या भागानंतर, मी 10 लोकांना विनंती आणि आव्हान देईन की ते त्यांच्या जेवणातील तेलाचे प्रमाण 10% कमी करू शकतात का? मी त्यांना 10 नवीन लोकांनाही हेच आव्हान देण्याची विनंती करेन. मला विश्वास आहे की, यामुळे लठ्ठपणाशी लढण्यास खूप मदत होईल.' भारताला त्याच्या एकूण खाद्यतेलाच्या गरजेपैकी 57% आयात करावे लागते.