फक्त 25 मिनिटांत मुंबईतून पुण्यात पोहचणार; भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट; जपानची टेक्नॉलॉजीही फेल

Hyperloop Train : भारतात विमानापेक्षा सपरफास्ट ट्रेन धावणार आहे. हायपरलूप ट्रेन असे याचे नाव आहे. भारतातील पहिली हापरलूप ट्रेन महाराष्ट्रातील मुंहई पुणे मार्गावर धावणार आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 19, 2025, 08:55 PM IST
फक्त 25 मिनिटांत मुंबईतून पुण्यात पोहचणार; भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट; जपानची टेक्नॉलॉजीही फेल title=

Hyperloop Train Pune To Mumbai : जपानची टेक्नॉलॉजीही भारतासमोर फेल ठरणार आहे. जगातील सर्वात मोठ्या शक्तीशाली प्रोजेक्टवर भारतासह अनेक देश काम करत आहेत. मात्र, यात भारताने मोठं यश मिळवले आहे. या प्रकल्प प्रत्यक्षात कार्यन्वित झाला तर, मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनिटातं होणार आहे. विमानापेक्षा सुपरफास्ट असलेल्या हायपरलूप ट्रेनचा प्रकल्प आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात कधी कार्यन्वित होईल जाऊन घेऊया.

भारतीय रेल्वे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. भारतीय रेल्वे जगात चौथ्या स्थानावर आहे.  रेल्वे हे दळणवळणाचे जलद आणि सुखद माध्यम आहे. यामुळेच लाखो लोक रेल्वेने प्रवास करत. देशात रेल्वे प्रवास अधिक गतीमान करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ही भारतातील सर्वात सुपरफास्ट ट्रेन आहे. लवकरच भारतात बुलेट ट्रेन धावणार आहे. तर, दुसरीकडे हायपरलूप ट्रेन प्रकल्प सुकु करण्यासाठी देखील संशोधन सुरु आहे. 

हायपरलूप ट्रेनने विमानापेक्षा सुपफास्ट प्रवास करता येणार आहे. हायपरलूप ही संकल्पना नवीन नाही. एलोन मस्क यांनी 2013 मध्ये ही आयडिया मांडली होती. लॉस एंजेलिस ते सॅन फ्रान्सिस्कोला न थांबता लोकांची ने-आण करण्यासाठी त्यांनी हायपरलूप ट्रेनची संकल्पना मांडली होती.यानंतर, भारतासह जपानसारखे अनेक देश या प्रोजेक्टवर काम करत आहेत. मात्र, भारताने यात मोठे यश मिळवले आहे. 

भारताची टेक्नॉलॉजी पाहून जपानही थक्क झाला आहे.   हायपरलूप  ट्रेनच्या चाचणीसाठी भारतात 410 किमीचा ट्रॅक तयार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी सोशल मिडियावर शेअर केला होता. रेल्वे आणि आयआयटी मद्रास यांनी मिळून हा ट्रॅक तयार केला आहे. अविष्कार या स्टार्टअपच्या माध्यमातून या प्रोजेक्टवर काम सुरु आहे. 

भारतातील पहिली हायपरलूप ट्रेन मुंबई ते पुणे दरम्यान धावणार असल्याची चर्चा आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी रेल्वेला 3 ते 4 तास लागतात. हा विनाथांबा सुसाट प्रवास असेल. हायपूरलूप ट्रेनच्या या पॉडमध्ये एकावेळी 24-28 लोक बसू शकतील. 

हायपरलूप ट्रेन ही एक हाय स्पीड ट्रेन आहे. ट्यूब व्हॅक्यूममध्ये ही ट्रेन धावते. चुंबकीय तंत्रज्ञानाने सुसज्ज पॉडवर ही ट्रेन धावते. पारदर्शक ट्यूबमधून ही ट्रेन धावते. ट्यूबमध्ये घर्षण नसल्यामुळे हायपरलूप ट्रेन  वेग ताशी 1100 ते 1200 किमी इतका असतो. भारतीय रेल्वेने विकसित केलेल्या हायपरलूपचा कमाल वेग 600 किमी आहे. यामध्ये विजेचा खर्च खूपच कमी आहे.  ही हायपरलूप ट्रेन पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे.   बुलेट ट्रेनपेक्षा हायपरलूप ट्रेन सुपरफास्ट आहे. या वेग ताशी 1100 किमी पर्यंत पोहोचू शकेल. म्हणजेच दिल्लीहून पाटण्याला जाण्यासाठी 1 तासापेक्षा कमी वेळ लागेल. मात्र, याचा परिचालन वेग ताशी 360 किमी आहे. 

2019 मध्ये मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला भेट दिली होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर देवंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असून ते या प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.