लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरवले आणि आता...

भारताचा ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसलाय. या जवानाला परत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

Updated: Sep 30, 2016, 04:20 PM IST
लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरवले आणि आता... title=

धुळे : भारताचा ३७ आरआर बटालियनचा जवान चंदू बाबुलाल चव्हाण अनावधानाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसलाय. या जवानाला परत आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत.

चंदू २३ वर्षांचे असून ते धुळ्यातील बोरविहीर या गावचे आहेत. २०१२मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले. चंदूच नव्हे तर त्यांचा भाऊही सैन्यात आहे. 

चंदूचे आई-वडील लहानपणीच वारले. चंदू आणि त्यांचे भाऊ यांना आजी-आजोबांनी सांभाळले. मात्र चंदूला पाकिस्तानने ताब्यात घेतल्याचे कळल्यानंतर आजीचा जबर धक्क्याने गुरुवारी रात्री मृत्यू झाला.