मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प

भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई आणि नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे.

Updated: Feb 27, 2016, 12:09 PM IST
मुंबई-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प title=

भुसावळ: भुसावळजवळ मालगाडीचे चार डबे रुळांवरून घसरल्याने मुंबई आणि नागपूरदरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक ठप्प झाली आहे.  पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे लांब पल्ल्यांच्या इतर गाड्यांवरही परिणाम झाला असून त्यांचे वेळापत्रक कोलमडलंय. 

अनेक गाड्या अनिश्चित काळासाठी उशीराने धावत आहेत. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे डबे रुळांवरून हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी वाहतूक पूर्वपदावर आणखी काही वेळ लागेल अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे.