पाकिस्तानला महाराष्ट्रात खेळू देणार नाही- राज

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौ-यावर येणाराय.

Updated: Sep 12, 2012, 08:08 AM IST

www.24taas.com, मुंबई
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच महाराष्ट्रात खेळू देणार नसल्याचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलाय. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाकिस्तानची क्रिकेट टीम भारताच्या दौ-यावर येणाराय.
पाकिस्तानी कलाकारांचा सहभाग असलेल्या सुरक्षेत्र या कार्यक्रमालाही राज ठाकरेंनी विरोध केला होता. त्यापाठोपाठ आता राजनी पाक क्रिकेटपटूंनाही महाराष्ट्रात खेळण्यास विरोध केल्यानं हा मुद्दा चांगलाच तापण्याची शक्यता आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध अधिक सौहार्दाचे करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे.
दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी एकमेकांची व्हिसा प्रक्रिया नुकतीच सुलभ करण्यात आली. त्यापाठोपाठ आता पाकिस्तान क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.