`राज आणि अजित पवारांमधील युद्ध दुर्दैवी`

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 3, 2013, 07:44 PM IST

www.24taas.com, सांगली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सुरु असणारे युद्ध दुर्दैवी असल्याची टीका वनमंत्री पतंगराव कदम यांनी केली. सांगलीमध्ये कदम प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दुष्काळी परिस्थितीत एकमेकांच्या उकाळ्या पाकाळ्या काढणे योग्य नसून सरकार पुढे सध्या दुष्काळ हा एकच प्रश्न असल्याने सर्वानीच राजकारण बाजूला ठेवावं आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहनही वनमंत्री पतंगराव कदम यांनी केले आहे.
तर दुसरीकडे राज ठाकरे हे नकलाकार असून ते नकलाच करणार असा टोला केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी शिंदे यांची खिल्ली उडविली होती. याची परतफेड शिंदे यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषेदेत केली आहे.