टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 5 खेळाडू गंभीर जखमी

टीम इंडियासाठी गंभीर बातमी, गौतम गंभीर आणि रोहित शर्माचं वाढलं टेन्शन

Updated: May 13, 2022, 05:02 PM IST
टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, 5 खेळाडू गंभीर जखमी title=

मुंबई : टी 20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं टीम इंडियाची तयारी सुरू आहे. आयपीएलमध्येही काही खेळाडू जखमी झाले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 5 खेळाडूंना दुखापत झाल्याने टेन्शन आलं आहे. 

चेन्नईकडून 14 कोटी रुपये देऊन दीपक चाहर आयपीएल खेळणार होता. मात्र तो आयपीएल सुरू होण्याआधी गंभीर जखमी झाला. तो आयपीएल खेळू शकला नाही. आता टी 20 वर्ल्ड कपपर्यंत देखील तो खेळू शकणार की नाही? याबाबत शंका आहे. 

सूर्यकुमार यादवलाही दुखापत झाली आहे. 6 मे रोजी गुजरात टायटन्स विरोधात झालेल्या सामन्यात दुखापत झाली. त्यानंतर तो बाहेर झाला. आधीपण सूर्यकुमारला दुखापत झाली होती. आता सूर्यकुमारला टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याला संधी मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन हे तिघेही दुखापतीमुळे टीममधून बाहेर आहेत. यंदा टी 20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्मा टीमची मोट बांधणार आहे. यावेळी अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळू शकते. तर दुसरीकडे कसलेले खेळाडू दुखापतीमुळे टीम बाहेर झाल्याने रोहित शर्माचं टेन्शन वाढलं आहे.