'असे' पुरुष वैवाहिक जीवनात असतात नाखूश, विवाहबाह्य संबंध देखील शांती देत ​​नाहीत!

जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या पुरुषांना विवाहबाह्य संबंध करूनही शांती मिळत नाही.

Updated: Aug 18, 2022, 11:13 AM IST
'असे' पुरुष वैवाहिक जीवनात असतात नाखूश, विवाहबाह्य संबंध देखील शांती देत ​​नाहीत! title=

मुंबई : लग्नानंतर वैवाहिक जीवनात सर्व गोष्टी सुरळीत होणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, काही लोकांना लग्नानंतर सुख मिळत नाही. अशा परिस्थितीत ते बाहेर संबंध बनवण्याचा प्रयत्न करतात. असं सर्व गोष्टी सुरळीत होत नाहीत. अशा पुरुषांचा विचार केला तर या लोकांचं लग्न तुटण्याच्या मार्गावर असतं. जाणून घेऊया कोणत्या प्रकारच्या पुरुषांना विवाहबाह्य संबंध करूनही शांती मिळत नाही.

लग्नाच्या रेषेत दोन शाखा

जर पुरुषाच्या तळहातातील विवाह रेषेला फाटे फुटत असतील तर त्यांचे वैवाहिक जीवन अशांततेने भरलेलं असतं. अशा लोकांचे लग्न बहुतेक तुटण्याची शक्यता असते. शिवाय वैवाहिक जीवनात प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत.

शांती प्राप्त होत नाही

विवाह रेषेतून विवाहबाह्य संबंधांचेही संकेत मिळतात. अशा लोकांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर नंतरही शांती मिळत नाही आणि चुकीची पावलं उचलण्याच्या नादात ते स्वतःचं नुकसान करतात.

दुसरं लग्न करण्याचा विचार

असे लोक त्यांच्या पहिल्या लग्नापासून घटस्फोट घेतात आणि दुसरं लग्न करतात. तरीही त्यांना शांती मिळत नाही. हे लोक स्वतःला वैवाहिक जीवनाला बंधन समजतात. हे लोक नेहमी इतरांसोबत आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे  ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)