सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतासाठी पहिल्यांदाच शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीला कणकवलीच्या मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झालं असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

Updated: Apr 6, 2018, 10:19 PM IST
सिंधुदुर्गात भाजप विरोधात राणे, ७७ टक्के झालं मतदान, निकालाकडे सर्वांचं लक्ष title=

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतासाठी पहिल्यांदाच शांततेत मतदान पार पडलं. या निवडणुकीला कणकवलीच्या मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या निवडणुकीसाठी सरासरी ७७ टक्के मतदान झालं असून या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

राणे बालेकिल्ला शाबूत राखणार का?

कारण, नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाची खरी कसोटी कणकवलीत लागणार आहे. या निवडणुकीत नारायण राणे आणि भाजप समोरासमोर ठाकल्यानं राणे आपला बालेकिल्ला शाबूत राखणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

१७ पैकी १६ जागांसाठी मतदान

नारायण राणेंना घेरण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजपनं केलाय. त्याला किती यश मिळेल हे निकालानंतर स्पष्ट होईल. १७ जागांपैकी १६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर एका जागेसाठी ११ एप्रिलला मतदान होणार आहे. १२ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.

भाजप-शिवसेनेची युती

राणे यांनी भाजपशी मिळते जुळते घेत भाजपच्या मतदतीने ते राज्यसभेवर निवडले गेलेय. राणे राज्यसभा खासदार झालेत तरी सिंधुदुर्गात भाजप विरोधात त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक लढविताना चित्र दिसून येत आहे. सिंधुदुर्गात भाजप आणि शिवसेनेची युती पाहायला मिळत आहे.

राणे आपलं वर्चस्व निर्माण करणार का?

दरम्यान, सिंधुदुर्गात खरी लढत ही शिवसेना विरुद्ध स्वाभिमान पक्षाची आहे. मात्र, ज्या भाजपच्या मदतीने राणे खासदार झालेत. ते पाहता राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राणे नगरपंचायतीत निवडणुकीत आपले वर्चस्व निर्माण करतात की शिवसेना यश मिळते याकडे लक्ष लागलेय.