पितृपक्षात संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार का? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Pitru Paksha Sankashti Chaturthi : पितृपक्ष सुरु झाला आहे आणि शनिवारी संकष्टी चतुर्थी आहे. अशावेळी संकष्टीचा उपवास धरावा का? असा प्रश्न अनेकांना पडलाय, काय कराल? 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Sep 20, 2024, 08:05 AM IST
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी साजरी केली जाणार का? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ  title=

Sankashti Chaturthi Shubh Muhurat 2024 : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी असे संबोधतात. या उपवासाच्या दिवशी गणेश स्त्रोताचे पठन केले जाते ज्यामुळे सुख समृद्धी प्राप्त होते. 

कधी आहे संकष्टी चतुर्थी 

वैदिक पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 20 सप्टेंबर रोजी रात्री 9.15 वाजता सुरू होईल. जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.13 वाजता समाप्त होईल. या तिथीला चंद्रदर्शनाचा शुभ मुहूर्त रात्री 8.29 आहे. उदयतिथी पडल्यामुळे 21 तारखेला संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे.

विघ्नराज संकष्टी चतुर्थी पूजा पद्धत

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे.

मग स्वच्छ कपडे घाला. यानंतर पूजास्थळ पूर्णपणे स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे.

त्यानंतर श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी.

आता योग्य विधी करून गणपतीची पूजा करा.

पूजेच्या वेळी ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.

तसेच गणपतीला मोदक अर्पण करावेत. असे केल्याने तुम्ही संकष्टी चतुर्थीची पूजा करू शकता.

पंचांग

सूर्योदय - सकाळी 06:09

सूर्यास्त - संध्याकाळी 06:19

चंद्रोदय - रात्री 08:29

चंद्रास्त - सकाळी 09:34

ब्रह्म मुहूर्त - 04:34 पहाटे ते 05:22 पहाटे

विजय मुहूर्त - दुपारी 02:15 ते 03:04 पर्यंत

संध्याकाळची वेळ - 06:19 संध्याकाळी ते 07:42 संध्याकाळी

निशिता मुहूर्त - दुपारी 11:50 ते 12:38 पर्यंत

विघ्नराज संकष्टी चतुर्थी पूजेचे महत्व

हे व्रत पाळल्याने घरात सुख-शांती नांदते आणि अडथळ्यांचा राजा सर्व दु:ख दूर करतो. यामुळे घरात ऐश्वर्य आणि समृद्धी येते.

पितृपक्षात संकष्टी साजरी करावी का?

पितृपक्ष हा अशुभ काळ मानला जातो, पण हे चुकीचा आहे. पितृपक्षाचा काळ हा पितरांना आणि घरातील ज्येष्ठ मंडळी ज्यांचा मृत्यू झालाय त्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यामुळे पितृपक्ष हा काळ शुभ असून या दिवसांमध्ये आलेली संकष्टी चतुर्थी देखील शुभ मानली जाते.