भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय

सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगत आहे.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 4, 2018, 01:21 PM IST
भारताने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजीचा निर्णय title=

सेंच्युरीयन : सुपरस्पोर्ट्स पार्क मैदानावर आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा एकदिवसीय सामना रंगत आहे.

भारताने टॉस जिंकून प्रथम गोलंदांजीचा निर्णय घेतला आहे. पहिला सामना जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न आज भारत करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु-प्लेसिस दुखापतीमुळे एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्याऐवजी संघाची धुरा एडेन मार्करमवर सोपवण्यात आली आहे. डिविलियर्स देखील 3 सामन्यातून बाहेर आहे.