शेतकरी

मोदी सरकारविरोधात राजू शेट्टींचा इशारा

 रेल्वे दरवाढीनंतर आता शेतमालाच्या दरावरून मोदी सरकारला शेतक-यांच्या रोषाचा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत. केंद्र सरकारनं शेतमालाच्या ठरवलेल्या किमान आधारभूत किंमतींना दुसरं तिसरं कुणी नव्हे एनडीएचा घटक पक्ष असलेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंच आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर आधारभूत किंमत वाढवून दिल्या नाहीत तर तीव्र आंदोलनाचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी मोदी सरकारला दिलाय.  

Jun 27, 2014, 07:30 PM IST

शेतकऱ्यांनो पेरण्या करु नका, केंद्र सरकारची बैठक

जून बरोबरोबरच जुलै महिना देखील पावसासाठी फारसा समाधानकारक नसल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केलाय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पाऊस होत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचा सल्ला डॉ. साबळे यांनी दिलाय. त्याचप्रमाणे पावसाचा कमी झालेला कालावधी लक्षात घेऊन पीक पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज डॉ. साबळे यांनी व्यक्त केलीय. 

Jun 26, 2014, 07:21 PM IST

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

Jun 23, 2014, 01:41 PM IST

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

May 28, 2014, 09:46 AM IST

रायगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.

May 21, 2014, 07:35 PM IST

गारपिटग्रस्तांच्या यादीत खासदार जया बच्चन

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा सिने अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांना फटका पडला आहे.

May 1, 2014, 01:56 PM IST

सरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले

खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

Mar 20, 2014, 04:42 PM IST