शेतकरी

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

Oct 23, 2012, 09:13 AM IST

`झेंडूची फुले` शेतकऱ्यांच्या साथीला

पावसाअभावी फुलांचं उत्पादन घटल्यानं आवक कमी झाली पर्यायी यंदा फुलांना चांगला दर मिळतोय. दसरा आणि दिवाळीतही शेतक-यांना चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून दुष्काळात शेतक-यांना झेंडुनं चांगली साथ दिलीय. जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना झेंडुला ३० ते ४० रुपये दर मिळाल्याने इथला शेतक-यांचे प्रयत्न यशस्वी झालेत.

Oct 22, 2012, 09:19 AM IST

पुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा

पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

Oct 15, 2012, 05:02 PM IST

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

Sep 30, 2012, 08:24 AM IST

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!

बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.

Aug 17, 2012, 04:39 PM IST

उदयनराजेंविरुद्ध शेतकऱ्यांना हवाय न्याय

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा आला. विवेक पंडित यांनी साता-यात महसूल खात्याच्या चुकीच्या धोरणाबाबत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या अन्यायाविरोधात मोर्चा काढला होता.

Jul 17, 2012, 09:18 PM IST

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

काही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.

Jul 11, 2012, 10:35 PM IST

कष्ट अन् विज्ञानानं घडवला चमत्कार...

गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.

Jul 10, 2012, 10:13 AM IST

आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांचा जीव जाणार ?

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या शह-काटशहाचा फटका राज्यातील जिल्हा बँकांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना बसू लागला. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.

Jun 5, 2012, 04:14 PM IST

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

May 5, 2012, 11:07 PM IST

कोल्हापूरमध्येही अफूची शेती

कोल्हापुरातल्या शाहूवाडी तालुक्यात सापडलेल्या अफू शेती प्रकरणी एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. शाहूवाडीतल्या शिवारे गावातील शेतकऱ्याच्या शेतात सापडलेल्या अफूच्या झाडांची किंमत दोन लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

Mar 14, 2012, 08:30 AM IST

विहीरीने केलं शेतकऱ्याला श्रीमंत

जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावातल्या एका विहिरीच्या खोदकामात पांढराशुभ्र हिरेसदृश्य खडक सापडला. हे मौल्यवान दगड विकताना शेतकरी पकडला गेल्यानं हा प्रकार उघडकीस आला.

Mar 8, 2012, 03:15 PM IST

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

Feb 29, 2012, 03:21 PM IST

गुजरातमध्ये शेतकऱ्यांना पोलिसांनी झोडपले

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला. या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. त्मामुळे वातावरण तप्त झाले आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याची भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

Feb 24, 2012, 11:40 AM IST

हळद, आल्याच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न

लातूर तालुक्यातील भिसे वाघोळी या गावातील बसवराज मोदी यांनी ऊस शेतीला समाधानकारक दर मिळत नसल्याने दीड एकरावर हळद आणि आर्ध्या एकरावर आले पिकाची लागवड केली.

Jan 13, 2012, 08:49 PM IST