शेतकरी

शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

उस्मानाबादमध्ये शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. शासकीय चारा छावणी बंद झाल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन केलं..

May 15, 2013, 10:00 PM IST

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

May 14, 2013, 10:08 PM IST

शेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर

शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.

May 9, 2013, 03:19 PM IST

शेतकरी मागतोय सरकारकडे आत्महत्येची परवानगी

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

Apr 8, 2013, 08:57 PM IST

दुष्काळावर शेतकऱ्याची नामी शक्कल !

दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतक-यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे.

Apr 4, 2013, 05:06 PM IST

कर्जमाफीचा घोटाळा

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

Mar 18, 2013, 11:30 PM IST

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

Mar 18, 2013, 06:13 PM IST

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

Mar 10, 2013, 07:11 PM IST

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल

कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.

Mar 7, 2013, 08:04 PM IST

शेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ

शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.

Mar 6, 2013, 08:00 PM IST

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

Dec 30, 2012, 09:18 PM IST

विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.

Dec 11, 2012, 12:08 PM IST

कोल्हापूरला शेतकऱ्यांना गूळ कडू

गूळ व्यापा-यांच्या मनमानीमुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणिवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

Dec 4, 2012, 06:24 PM IST

शेतकऱ्यांचा वाली कोण?

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

Nov 14, 2012, 04:38 PM IST

...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी

चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.

Oct 28, 2012, 08:06 AM IST