drought

दुष्काळग्रस्तांसमोर कासारे गावाचा आदर्श

दुष्काळात होरपळणा-या राज्यातल्या शेकडो गावांसाठी अहमदनगरच्या कासारे गावानं आदर्श निर्माण केलाय. जलव्यवस्थापनाच्या जोरावर या गावानं पाणीटंचाईवर मात केलीये. त्यामुळेच जिल्ह्यातील अनेक गावांत पाण्यासाठी भटकंती सुरु असताना कासारे गाव 'सुजलाम सुफलाम' आहे.

May 26, 2012, 08:06 AM IST

दुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

May 16, 2012, 08:47 PM IST

राज्याने मागितले २२०० कोटी, केंद्राने दिली समिती

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडे एकूण २२८१ कोटींची मागणी केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यापैकी दुष्काळी सिंचनासाठी १२०० कोटी तर तातडीच्या उपाययोजनांसाठी १५०० कोटींच्या निधीची मागणी राज्यानं केंद्राकडं केलीय.

May 8, 2012, 09:51 PM IST

राष्ट्रवादीवर कुरघोडी, CM भेटले PM यांना!

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेत राज्यातल्या दुष्काळी स्थितीबाबत चर्चा केली. यावेळी पॅकेज देण्याची मागणी करण्यात आली. यासाठी काँग्रेसकडून पंतप्रधानांना निवेदनही देण्यात आलं.

May 7, 2012, 10:00 PM IST

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय

May 7, 2012, 07:23 PM IST

एक कळशी पाणी दहा रुपयांना!

सुजलाम सुफलाम अशी ओळख असणा-या महाराष्ट्रात एक कळशी पाणी पाच ते दहा रुपयांना विकत घ्यावं लागतंय.... ही कहाणी आहे जालन्यातली....या शहरात महिन्यातून एकदाच नळाला पाणी येतं.

May 7, 2012, 04:58 PM IST

दुष्काळासाठी राज्याचं केंद्राला साकडं!

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारनं केंद्राकडं 2 हजार 281 कोटी 37 लाख रुपय़ांच्या पॅकेजची मागणी केलीये. या पॅकेजचं स्वरुप काय असणार आहे.

May 7, 2012, 04:23 PM IST

दुष्काळाचं दुष्टचक्र !

महाराष्ट्राच्या कुणा एका बळीराजाची व्यथा ही केवळ त्याचीच नाही तर महाराष्ट्रातल्या दुष्काळाचा सोस सोसणा-या असंख्य बळीराजाची आहे. अवघ्या काही महिन्यापुर्वी आम्ही ग्रामीण महाराष्ट्राचे नेते, शेतक-याचे पुत्र आहोत असं सांगत जोरदार भाषणबाजी करणा-या सा-यानीच आज या बळीराजाला एकटं पाडलय.. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना दुष्काळांन होरपळणा-या या सर्वसामान्यांना अस्मानीच नाही तर सुल्तानी संकटाला सामोरं जावं लागतय.. ज्यांच्याकडून थेट दिलासा मिळण्याची अपेक्षा त्या कृषीमंत्र्यानी दिलासादायक अस काहीच न सांगता धक्कादायक विधान करत राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यावरच दुष्काळाच खापर फोडलं..

Apr 6, 2012, 11:39 PM IST